Employees Regulation of Transfers 2025
san 2026 madhil sarvsadharan badalyababat
Regarding general transfers in the year 2026
मंत्रालयीन सेवा
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
क्र.बदली-२०२६/प्र.क्र.५४/आस्था-७
दिनांक : २६ मे, २०२६.
विषय: सन २०२६ मधील सर्वसाधारण बदल्याबाबत
महोदय,
उपरोक्त विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन अधिनियम, २००५ मधील नियमाचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे :-
१. नियम ३ (१): अखिल भारतीय सेवेतील अधिकारी आणि अ, ब आणि क गटातील राज्य शासनाचे सर्व सेवक किंवा कर्मचारी यांच्याकरिता एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षाचा असेल :
२. नियम ४ (१): सामान्यपणे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कलम ३ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्याच्या पदस्थापनेचा पदावधी पूर्ण केला असल्यासोरीज त्याची बदली करण्यात येणार नाही.
३. नियम ४(२) सक्षम प्राधिकारी प्रत्येक वर्षाच्या जानेवारी महिन्यात, त्या वर्षी एप्रिल व मे महिन्यात बदलीसाठी पात्र होतील अशा शासकीय कर्मचाऱ्यांची यादी तयार करील.
४. नियम ५ : कलम ३ मध्ये किंवा या कलमामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, विशेष प्रकरणात, सक्षम प्राधिकाऱ्याला, कारणे लेखी नमूद करून फलम ६ च्या तक्त्यामध्ये उल्लेखिलेल्या [बदली करणाऱ्या लगत वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय कर्मचाऱ्याची, त्याचा पदावधी पूर्ण होण्यापूर्वी बदली करता येई.
२. तरी, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील उपरोक्त नमूद तरतुदी विचारात घेऊन आपल्या अधिपत्याखालील कार्यालातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांचा (उशिरा रुजू झालेल्या अधिकाऱ्यांसह) सन २०२६ मधील एप्रिल-मे २०२६ च्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेत समावेश करण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने निर्णय घ्यावा.
आपली,
(अनुजा लोंढे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र
प्रति,
१. सर्व विभागीय आयुक्त.
२. सर्व जिल्हाधिकारी.
———— ALSO READ ————
Employees Regulation of Transfers 2025
Notification of Maharashtra Government Employees Regulation of Transfers and Government Commencement: Prevention of Delay in Performance of Duties (Amendment) Act, 2025
Maharashtra Government Employees Regulation of Transfers and Government Commencement: Prevention of Delay in Performance of Duties (Amendment) Act, 2025
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय प्रारंभः कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) अधिनियम, २०२५
RNI No. MAHBIL/2009/40124
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग पाच
वर्ष ११, अंक ७ (७)] शुक्रवार, मार्च २१, २०२५/ फाल्गुन ३०, शके १९४६ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक २४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
महाराष्ट्र विधानसभेत दिनांक २१ मार्च, २०२५ रोजी पुरःस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :-
L. A. BILL No. XVI OF 2025.
A BILL FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA REGULATION OF TRANSFER OF GOVERNMENT SERVANTS AND PREVENTION OF DELAY IN DISCHARGE OF OFFICIAL DUTIES AСТ, 2006.
सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००६ यात सुधारणा करण्यासाठी विधेयक. सन २००६ चा महाराष्ट्र
(१) ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनासाठी, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००६ यात आणखी सुधारणा २१. करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या शहात्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:-
भाग पाच-२४-१
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २१, २०२५/ फाल्गुन ३०, शके १९४६
संक्षिप्त नाव व
१. (१) या अधिनियमास महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय प्रारंभः कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) अधिनियम, २०२५ असे म्हणावे.
(२) तो ताबडतोब अंमलात येईल.
सन २००६ चा महा. अधिनियम क्रमांक २१ यांच्या कलम ३ ची सुधारणा.
२. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ याच्या कलम ३ मधील पोट-कलम (१) च्या दुसऱ्या ५ “अशा कर्मचाऱ्याला तीन वर्षपिक्षा अधिक कालावधीसाठी त्याच पदावर ठेवण्यात येणार नाही. आणि लागोपाठच्या दोन पदावधीपेक्षा अधिक पदावधीसाठी त्याला त्याच विभागात ठेवण्यात येणार नाही” या मजकुराऐवजी “अशा कर्मचाऱ्याने धारण केलेल्या पदावरून कार्यक्षमता, तत्परता व सचोटी या आधाराशिवाय, (त्या पदावरून किंवा त्या विभागातून) बदली करण्यात येणार नाही” हा मजकूर दाखल करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच, मार्च २१, २०२५/फाल्गुन ३०, शके १९४६
उद्देश व कारणे यांचे निवेदन.
उद्देश व कारणे यांचे निवेदन
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००६ अंतर्गत प्रकरण दोन मध्ये कलम ३ (१) मधील दुसऱ्या परंतुकात सेक्रेटरिएट सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत नेमणुकीच्या पदावधीचा कालावधी नमूद केलेला आहे. परंतु सेक्रेटरिएट सेवेतील कर्मचारी हे साधारणतः स्मरण कृती (मेमरी फॅक्शन) नुसार काम करतात. परिणामतः कर्मचाऱ्याच्या कार्यात तत्परता व गती दिसून येत होती. परंतु एका विभागातून दुसऱ्या विभागात कर्मचाऱ्याच्या केवळ त्या विभागातील पदावधीच्या कालावधीनुसार झालेल्या बदलीमुळे संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर व काम करावयाच्या गतीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यामुळे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर किंवा एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करताना पदावधीच्या कालावधीची मर्यादा गैरवाजवी असून उक्त अधिनियमाचा हेतू व उद्देश यास बाधक असल्यामुळे उक्त मयदिऐवजी कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेच्या आधारावर बदली करण्याचे विहित केल्यास ते नियमास अनुरुप होईल असे वाटते.
वरील उद्दिष्ट साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.
सुधीर मुनगंटीवार,
प्रभारी सदस्य.
विधान भवन : मुंबई,
दिनांक दिनांक २१ मार्च, २०२५.
विधान भवन : जितेंद्र भोळे,
मुंबई, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा.

